Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*कवी राजेंद्र फंड यांच्या ‘जीवनदीप गाडगेबाबांचा’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार*

0 8 9 9 1 8

*कवी राजेंद्र फंड यांच्या ‘जीवनदीप गाडगेबाबांचा’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार*

अहिल्यानगर प्रतिनिधी :

सामाजिक प्रबोधन, संत साहित्य आणि समाजसुधारणेचा विचार आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडणारे कवी राजेंद्र फंड यांच्या ‘जीवनदीप गाडगेबाबांचा’ या काव्यसंग्रहाची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे ‘राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कवी राजेंद्र फंड यांनी ‘जीवनदीप गाडगेबाबांचा’ या काव्यसंग्रहातून संत गाडगेबाबांचे समाजप्रबोधनाचे कार्य, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश काव्यरूपाने प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वाची आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.
या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे, वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात होणार असून, तंजावर येथील युवराज मान. संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते कवी राजेंद्र फंड यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कवी राजेंद्र फंड यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या लेखणीतून सामाजिक जाणीवा अधिक प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचत राहाव्यात आणि साहित्य क्षेत्रातील त्यांची वाटचाल अशीच यशस्वी व्हावी, अशा शुभेच्छाही विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
सामाजिक परिवर्तनाचा विचार कवितेतून मांडणाऱ्या कवी राजेंद्र फंड यांच्या साहित्यिक योगदानाला मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव वाढविणारा असून, अहिल्यानगरच्या साहित्य क्षेत्रासाठीही ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे