*कै.सौ. कांताबाई आसाराम मुंगसे जाण्याने मुंगसे परिवाराचा आधारवड हरपला.

*कै.सौ. कांताबाई आसाराम मुंगसे जाण्याने मुंगसे परिवाराचा आधारवड हरपला.
देडगाव प्रतिनिधी युनूस पठाण – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मुंगसे परिवारातील कै. सौ. कांताबाई आसाराम मुंगसे यांच्या जाण्याने मुंगसे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घरात सर्वांपेक्षा मोठ्या असल्याने सर्व घराचा आधार होता.तर सर्वांना सुसंस्कृत संस्कार देण्याचे काम त्यांनी केले होते.साधी राहणी परंतु विचारसरणी मोठी असल्याने कुटुंबाला भक्कम साथ होती. मुंगसे परिवार हा राजकीय शैक्षणिक धार्मिक दृष्ट्या पुढारलेला असून या माऊलीने सर्वांना संभाळून प्रपंचामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता.आदर्श परिवारातून गेल्याने मुंगसे परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. व कांताबाई नावाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं.
त्यांच्या पश्चात पती, दीर, जावा मुलं, मुली पुतणे,सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे यांच्या आई होत्या.
तर तेरावा विधी 15 फेब्रुवारी रोजी ह भ प महंत रामेश्वर महाराज राऊत शास्त्रीजी यांच्या कीर्तनाने राहत्या घरी होणार आहे.




