सौ.अमृता श्रीकांत नळकांडे यांना धर्मासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल “हिंदुत्व शौर्य पुरस्कार २०२५” देऊन किल्ले राजगड येथे सन्मान.

नेवासाच्या सौ.अमृता श्रीकांत नळकांडे यांना धर्मासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल “हिंदुत्व शौर्य पुरस्कार २०२५” देऊन किल्ले राजगड येथे सन्मान
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
दिनांक ८-९ जून रोजी समस्त हिंदू बांधव सा.संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वराज्याची पहिली राजधानी दुर्गराज किल्ले राजगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य भव्य असा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान, पोवाडा, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके,पद्मावती देवीचा जागरण गोंधळ अशा विविध कार्यक्रमांचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते.दि ९ जून रोजी छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्यानंतर समाजात जनजागृती व हिंदू धर्माचे काम करणाऱ्या काही प्रमुख मान्यवरांना हिंदू धर्मसेवकांचा “हिंदुत्व शौर्य पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. सौ अमृता ताई नळकांडे यांनी समाज माध्यमात अनेक हिंदू जनजागृती विषयी शिबिर,मेळावे, व प्रोत्साहन पर अनेक महिलांचे एकत्रीकरण करण्याचे कौतुकास्पद काम केले या कामाची दखल घेऊन नेवासा येथील रहिवासी असलेल्या धर्मकार्यात व महिला सक्षमीकरण विषयावर उल्लेखनीय काम केल्याबद्दल भाजप प्रदेश महिला आघाडीच्या सचिव सौ.अमृता श्रीकांत नळकांडे यांना धर्मासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल “हिंदुत्व शौर्य पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त परिसरातून व तालुक्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना व हिंदू धर्म रक्षक यांच्याकडून ताईंना शुभेच्छा देण्यात येत आहे या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी किल्ले राजगड येथे ह.भ.प रोहिदास बापू चोरघे,
किर्तनकार संग्राम बापू भंडारे, विद्यमान आमदार सुनील शाळके,गोरक्षक मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू बांधव संस्थेचे सर्व धर्मसेवक तसेच सोनालीताई पडवळ, चारुताताई कडूरकर इ. व असंख्य शिवभक्त मान्यवर किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात उपस्थित होते.