भारतीय संघ बनला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विश्वविजेता,!
न्यूझीलंडचा चार विकेट ने काढला वचपा!

भारतीय संघ बनला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विश्वविजेता,!
न्यूझीलंडचा चार विकेट ने काढला वचपा!
प्रतिनिधी- नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने न्युझीलँडला चार विकेटने मात देऊन आपले विश्व विजेतेवर पुन्हा आपले नाव कोरले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या समवेत चौथ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ज्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली, आणि आपले 58 वे अर्धशतक पूर्ण करताना 76 रन बनवले. शुभमन गिल 31, अक्षर पटेल 29 ,के एल राहुल 34 ,आणि श्रेयस अय्यरणे मॅन ऑफ द सिरीजचा किताब फटकावला .50 ओव्हर मध्ये 252 रनचे लक्ष मिळालेल्या भारतीय संघाने नऊ चेंडू बाकी असताना आपले लक्ष पूर्ण केले फिलिप्स 34, मायकल ब्रेसवेल 53, रचीन रवींद्र 37, विल्यम्सम 15 आणि विल्यम्सन यांनी 11 राणाची खेळी केली. कुलदीप यादव याने दोन विकेट, रवींद्र जडेजा एक विकेट, मोहम्मद शमी एक विकेट,
तर वरून चक्रवर्तीने दोन विकेट घेण्यात यश मिळवले.