Breaking
ई-पेपर

भारती विद्यापीठाच्या सौ.मालती रामेश्वर साळुंके यांना फार्मसीमध्ये ‘पीएच.डी’ प्रदान!

0 6 0 5 0 6

भारती विद्यापीठाच्या सौ.मालती रामेश्वर साळुंके यांना फार्मसीमध्ये ‘पीएच.डी’ प्रदान!

नेवासे (प्रतिनिधी) – भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी),पुणे येथील मालती रामेश्वर साळुंखे यांना ‘फार्मास्युटिकल सायन्सेस’या विषयात नुकतीच विद्यापीठाने पी.एच.डी.पदवी जाहीर केली आहे.
​मालती साळुंखे यांनी “जखम भरून येण्यासाठी नाविन्यपूर्ण हर्बल फॉर्म्युलेशनचा विकास” या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला होता.त्यांच्या या संशोधनामुळे जखमांवर प्रभावी उपचार करण्यासाठी नैसर्गिक औषधी घटकांचा वापर कशा प्रकारे करता येईल, यावर प्रकाश पडला आहे ​त्यांना पुना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवणे येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.वैभव शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.बुधवार (दि.१८) फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाने त्यांच्या निकालाची अधिकृत घोषणा केली.
​त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरू, रजिस्ट्रार,शिक्षक वर्ग आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.या पदवीमुळे फार्मसी क्षेत्रात आणि विशेषतः हर्बल मेडिसिनमध्ये संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मालती साळुंके यां भास्कर यादव साळुंके यांच्या सुनबाई आहेत त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख,भानसहिवऱ्याचे माजी सरपंच देविदास साळुंके, अशोकशेठ बोरा,पुरुषोत्तम सर्जे,डॉ.सीएम उचित डॉ. साळुंखे,डॉ.भोईट,मार्केट कमिटीचे चेअरमन नंदकुमार पाटील,माजी पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे