*गळनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान.

*गळनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंब येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे ध्वज संचलन विद्यार्थिनी अंजली चव्हाण हिने केले तर ध्वजारोहणाचा मान गावच्या सरपंच सौ.कुसुमताई खर्जुले यांनी गावची पी.एस.आय. झालेली लाडकी लेक गीता मुळे यांना दिला.पी.एस.आय. गीता मुळे यांच्या हस्ते शाळेचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शाळेतील मुलांनी गावातून प्रभात फेरी काढली व देशभक्तीच्या घोषणा,देशभक्ती गीत,समूहगीत गायन केले. मिशन आपुलकी अंतर्गत पालक व ग्रामस्थांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना व शाळेला 7500 रुपयांचे रोख बक्षीसे दिले.तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गावच्या कन्या पी.एस.आय. गीता मुळे यांनी इयत्ता सातवीतील अंजली चव्हाण या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले व इयत्ता बारावी पर्यंतचा तिचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचे जाहीर केले. अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब खर्जुले यांनी देखील कल्याणी पवार या विद्यार्थिनीचे बारावीपर्यंत शैक्षणिक पालकत्व घेतल्याचे जाहीर केले.या दोन्ही विद्यार्थिनींचा बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च हे दोघे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं व गावातील दानशूर व्यक्तींनी आणखी काही होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून दत्तक घ्यावे असे आवाहन केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषण,देशभक्तीपर समूहगीत साजरे करण्यात आले.याप्रसंगी तालुका पातळी कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा पातळीसाठी पात्र ठरलेल्या मोठ्या गटातील मुलींच्या संघाचा व जिल्हा पातळी साठी निवड झालेल्या मोठ्या गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकारांचा ग्रामपंचायत गळनिंब यांच्यावतीने फेटे बांधून व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.केंद्र पातळी,तालुका पातळी वरील क्रीडास्पर्धा,बौद्धिक स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षा या सर्वांमध्ये यश प्राप्त करणाऱ्या मुलांचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती नेवासाचे माजी सभापती श्री.अशोकराव शेळके हे होते तर कार्यक्रमास सरपंच कुसुमताई खर्जुले,उपसरपंच विजू घावटे ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हरिभाऊ शेळके,जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब (पिंटूशेठ) शेळके, निलेश शेळके शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत शेळके व सर्व सदस्य,आरोग्य अधिकारी श्रीम.कानडे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.औताडे,ग्रामसेवक गणेश गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद खरात व दिपाली जाधव यांनी केले तर प्रास्ताविक अंबादास शेळके यांनी केले.आपल्या प्रास्तविकात त्यांनी शाळेमध्ये राबवले जाणारे उपक्रम,भविष्यातील योजना व विद्यार्थी अध्ययन अध्यापनात येणाऱ्या अडचणी व उपाय योजना यांचा आढावा घेतला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंब ही जिल्ह्यातील एक आदर्श शाळा तसेच टॅब स्कूल म्हणून ओळखली जात आहे.इन्फोसिस या अग्रगण्य आय.टी.कंपनीने शाळेला सी.एस.आर फंडामधून वीस टॅब दिले आहेत.या टॅब चा वापर विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी नियमित केला जातो व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.क्रॉम्प्टन ग्रीव्हज या इलेक्ट्रिक उत्पादन निर्मिती करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 45 बेंच,दहा ट्रिगार्ड व दहा रोपे यावर्षी मिळाली आहेत,या रोपांची लागवड व संवर्धन अत्यंत चांगल्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांनी केले आहे.मुलांना ही झाडे दत्तक देण्यात आली आहेत.त्यामुळे मुलं काळजीपूर्वक या झाडाचे रक्षण व संवर्धन करतात. शाळेला सी.एस.आर फंड मिळवून देण्यामध्ये गावचे सुपुत्र श्री.राहुल शेळके (उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर)यांचे मोठे योगदान आहे.त्यांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे शाळेचा सर्वांगीण विकास होत आहे.असे याप्रसंगी मुख्याध्यापक भारत गवळी यांनी नमूद केले.प्रमुख पाहुण्या असलेल्या पी.एस.आय.गीता मुळे यांनी याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी बिकटप्रसंगी स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले त्याचबरोबर गुणवत्ता जोपासून भविष्यामध्ये काय व्हायचं आहे याचं लक्ष आत्ताच निश्चित करा व ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी सांगितले.भारतीय प्रजासत्ताकाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने कार्यक्रमांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन अशोक मोरे यांनी केले सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रास्ताविकेचे वाचन केले व प्रतिज्ञा घेतली. मोहनीराज थोरात यांनी प्रजासत्ताकाचे व लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले.तर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व पाहुण्यांचे आभार भानुदास धाडगे यांनी व्यक्त केले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.