कर्जमाफीसाठी नेवाशात पेटणार टेंभा आंदोलन…
अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कर्जमाफीसाठी दिनांक ११/०४/२०२५ रोजी रात्री १२.०० टेंबा आंदोलन करणार..

कर्जमाफीसाठी नेवाशात पेटणार टेंभा आंदोलन…
अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार महोदय यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कर्जमाफीसाठी दिनांक ११/०४/२०२५ रोजी रात्री १२.०० टेंबा आंदोलन करणार…..
नेवासा प्रतिनिधी-
प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनामध्ये म्हटले आहे की आम्ही आपणास या निवदेनाव्दारे कळवितो की, महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते. आम्ही निवडुण आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकटानी शेतकरी कर्जाच्या घाईमध्ये डुबलेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला ७ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगतो आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे.
अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत. अशी जनतेला साद घालुन निवडुण आलेले आमदार महोदय कर्ज माफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी महाराष्ट्र हा विचारवंत आणि लढवय्या व्यक्तीचा महाराष्ट्र आहे. एप्रिल महिन्यामध्ये ११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. तो हक्क देणारे त्या संविधान निर्मात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल ला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळी शाल व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेवुन शेतकऱ्यांच्या कर्जामाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणुन आमदार महोदयांच्या निवासस्थानासमोर दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.०० वाजता शेतकऱ्यांच्या समस्येचा उजेड सर्व आमदार महोदयांना समजुन तो विधानसभेत पडावा यासाठी आंदोलन करणार आहोत असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की हे आंदोलन अहिल्यानगर उत्तर मधील तालुका प्रमुख यामध्ये नेवासा, श्रीरामपुर, अकोले, राहाता, संगमनेर, कोपरगांव, या सर्व तालुक्यातील आमदारांच्या निवासस्थानासमोर होणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवले आहे.
या निवेदन देण्याच्या प्रसंगी ज्ञानेश्वर माऊली सांगळे, प्रहार जनशक्ती पक्षा जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर, प्रहार जनशक्ती पक्षाचे अहिल्यानगर युवा जिल्हा अध्यक्ष एडवोकेट पांडुरंग केशव औताडे, जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढस, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप पाखरे या निवेदन देण्या प्रसंगी उपस्थित होते.