Breaking
ई-पेपर

चाळीस वर्षांनी वर्गमित्र सवंगडी आले एकत्र .

0 4 6 0 8 8

चाळीस वर्षांनी वर्गमित्र सवंगडी आले एकत्र ….

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

चाळीस वर्षानंतर एकाच वर्गात शिकत असलेले सवंगडी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे शेवगाव येथे पाहायला मिळाले .

या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगळे सर हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प उदागे महाराज, नवल सर, सुडके सर, या कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना ज्ञानदेव नजन तसेच अनुमोदन सुखदेव पवार यांनी दिले.

यावेळी नवल सर बोलतांनी म्हणाले की तुम्ही या शाळेमध्ये शिकले मोठे झाले व तब्बल 40 वर्षानंतर आज आपण सगळे भेटतोय याचा मलाही आनंद होतोय व गहिवरून येते मी जे विद्यार्थी शिकवली ते आज चाळीस वर्षानंतर ही मला आठवणी ठेवून या कार्यक्रमासाठी बोलावतात यातच मी दिलेली शिकवण दिसून येत आहे. अशी विद्यार्थी माझ्या हातून घडले यातच माझे शिक्षक सेवक म्हणून केलेली नोकरी फळास आली.

तसेच सुडके सर बोलताना म्हणाले की हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सखाहरी कोरडे या माझ्या विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न केले सखाहरी कोरडे सारखा विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी म्हणून मी माणतो सखाहरी कोरडे हा विद्यार्थ्यांची नेहमी एकत्रित आणण्याचे काम शालेय जीवनामध्ये त्यांनी केले व यापुढे तो करत असल्याचे मला जाणवत आहे सखाहरी कोरडेयांच्या बद्दल गौरव स्पद उद्गार यावेळी सुटके सरांनी काढले.

आगळे सर म्हणाले की मी तुम्हाला काय दिले की त्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम ठेवला प्रत्येक शिक्षकाचे हे कामच असते आपल्या विद्यार्थी घडवण्याची त्यांना शिकवण देण्याचे परंतु तुम्ही हा कार्यक्रम ठेवला यातच माझे मन भरून आले आहे व असे विद्यार्थी 40 वर्षानंतर ही शिक्षकांना लक्षामध्ये ठेवतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

हे वेळी ह .भ.प उदागे महाराज म्हणाले की मी 15 ते 20 वर्ष पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मेळाव्या बघितल्या आहे परंतु 40 वर्षानंतर विद्यार्थ्यांचा मेळावा आज मी पहिल्याच वेळेस बघतो आहे हा मेळावा बोलताना मला अति आनंद होत आहे आणि 40 वर्षानंतर चा सवंगडी एकत्र येताना किती आनंद होत असेल हे मला जाणीव आहे पुढेही आपण असेच एकत्रित येत राहावे व एकमेकाची सुखदुःख करून घ्यावेत तसेच स्नेह मेळाव्याने आनंद हा द्विगुणीत होतो व पुढे जीवनामध्ये जगण्यासाठी आणखीन उत्साह निर्माण होतो मेळाव्याचे उद्दिष्टचे असते की एकमेकांचे सुखदुःख व आपल्यामधील असलेला दुरावा आणखीन कमी करावा तरीही मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व आपली मैत्री अशीच फुलवत राहावी ही अपेक्षा व्यक्त करतो. असे ह भ प उदागे महाराज बोलताना म्हणाले. तसेच हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सखाहारी कोरडे यांचे मोठे श्रम आहेत.

मेळाव्याचे विशेष बाब म्हणजे बाबासाहेब खराडे नावाच्या विद्यार्थी यांच्या पुणे येथे मोठा सत्कार असतानाही ते त्या शेतकऱ्याला फाटा देऊन या स्नेह मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान केला व कौतुक केले.
ते तसेच नानासाहेबा अहिरे हे सुरत येथे कामानिमित्त ने राहत असतानाही त्यांनी वेळात वेळ काढून स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थितीत राहीले त्याबद्दल त्यांचाही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच लक्ष्मण बनकर यांनी आपली स्वतःची पिकअप गाडी घेऊन सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमास्थळी पोहोच केले त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आगळे सर, प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प उदागे महाराज, नवल सर, सुडके सर, ज्ञानदेव नजन ,सुखदेव पवार ,
पूजाराम सोलाट, सखाहरी कोरडे, गोरख भगत, अशोक दुधाडे, अशोक कातकडे, भाऊसाहेब बोडखे, दत्तात्रय काळे, वाल्मीक कोरडे, आत्माराम नरोडे, नानासाहेब चेडे ,मारुती थोरात, लाला भाई सय्यद, नानासाहेब अहिरे, सुरेश साळुंके, लक्ष्मण बनकर, भाऊसाहेब सोलाट, धर्मा खरात, बाबासाहेब खराडे,अशोक भगत रंगनात घारे आदी विद्यार्थी मोठे संख्येने या स्नेह मेळाव्या प्रसंगी उपस्थित होते.
अतिशय हास्यमय व आनंदीमय वातावरणामध्ये पार पडला.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे