सच्चिदानंद आदिवासी आश्रम शाळेचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

सच्चिदानंद आदिवासी आश्रम शाळेचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्राईम फाउंडेशन खर्डा अहिल्यानगर संचलित सच्चिदानंद आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रम शाळा लोहारवाडी घोडेगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी विद्यार्थी प्रवेशोत्सव व नवगतांचे स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी नेवासा मतदार संघाचे माजी आमदार जय हरी बाळासाहेब मुरकुटे साहेब प्राईम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू फटांगरे पाटील साहेब, प्राईम फाउंडेशन संस्थेच्या सचिव वैष्णवी ताई फटांगरे पाटील मॅडम, राज्यस्तरीय दलित मित्र पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक श्री भाऊसाहेब सावंत, चांदा केंद्राचे केंद्रप्रमुख दहातोंडे सर, ज्ञानेश्वर ट्रस्टचे विश्वस्त श्री कृष्णा भाऊ पिसोटे, श्री गंगाधर फटांगरे, श्री नामदेव घोडचोर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर कार्यालयाचे श्री. शेळके साहेब उपस्थित होते.
नेवासा मतदार संघाचे माजी आमदार जय हरी बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष नेवासा तालुक्याचे माजी आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे साहेब यांनी नेवासा तालुका व आसपासच्या भागात आदिवासी विकास विभागाचे एकमेव शाळा सुरू झाल्याने आदिवासी बांधवांना नक्कीच फायदा होईल असे सांगितले, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू फटांगरे पाटील साहेब यांनी संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट याबद्दल बोलताना आदिवासी बांधव व विद्यार्थी यांना उत्तम आहार आरोग्य व दर्जेदार शिक्षण देण्या साठी ही संस्था कायमच प्रयत्नशील राहील तसेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व संस्था भविष्यकाळात आपल्या आश्रम शाळेचा माध्यमातून चांगले अधिकारी क्रीडा क्षेत्रात चांगले खेळाडू घडवू शकते असा विश्वास बोलून दाखवला, श्री भाऊसाहेब सावंत यांनी नेवासा तालुका व परिसर या भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा सुरू केल्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू फटांगरे पाटील साहेब यांचे कौतुक केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना फार मोलाचे मार्गदर्शन केले व व शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी आश्रम शाळेत प्रवेश घेतील यासाठी प्रयत्न करावे असे सुचवले, राजुर प्रकल्प कार्यालयाचे श्री शेळके साहेब यांनी आदिवासी विकास विभागाच्या योजनांबद्दल विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती दिली तसेच समाजातील वंचित राहिलेला घटक शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी आश्रम शाळा हा उत्तम पर्याय आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी असून शाळेत निवासी राहून उत्तम शिक्षण आहार घेतील असा विश्वास व्यक्त केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कल्पना फटांगरे मॅडम यांनी आभार मानले.