इमामपूर मध्ये वीज पडून तरुण शेतकऱ्यांचे निधन,
सायंकाळच्या सुमारास घडली घटना. दुसऱ्या शेतकऱ्यांसह १० ते १५ शेतकरी बलाबल वाचले.

इमामपूर मध्ये वीज पडून तरुण शेतकऱ्यांचे निधन,सायंकाळच्या सुमारास घडली घटना.
दुसऱ्या शेतकऱ्यांसह १० ते १५ शेतकरी बलाबल वाचले.
भेंडा ( प्रतिनिधी)-
नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल दि १२ मे रोजी सायंकाळच्या साडे सहाच्या वाचण्याचा सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यात आकाशात वीजच कडकडाट आवाज ऐकू येत होते.त्यामध्ये शेतात काम सुरू असलेल्या तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे वय ३४ वर्ष यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की,इमामपूर गावातील पोपट जानकी राम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र (डीपी)आहे.त्यात ते विद्युत रोहित्र जळाले होते.पण काल ते दुरुस्त करून बसविण्यात आले नंतर त्या रोहित्र वरून विद्युत पुरवठा करणाऱ्या नवीन विद्युत तारा कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते.पण सायंकाळी साडेसहा वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली, त्यामध्ये गणेश शिवाजी काळे वय वर्ष ३४ या तरुण शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून त्या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
या घटनास्थळी कामगारांना सह आजून १० ते १५ शेतकरी देखील उपस्थित होते. त्यात आजून एक रामदास गोरक्षनाथ काळे वय ४५ वर्ष या शेतकऱ्यांची बी पी वाढून त्यांना देखील त्रास होत होता.त्यांना पुढील उपचारासाठी पाचेगाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.गणेश काळे यांना आधी पाचेगाव येथील खाजगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नेवासा फाटा येथील खाजगी दवाखान्यात पाठविण्याचा सल्ला दिला. पण नेवासा येथील डॉक्टरांनी गणेश याला मृत घोषित केले.गणेश यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील,भाऊ, दोन वर्षाचा मुलगा,मुलगी असा परिवार आहे.गणेश याची ओळख शांत स्वाभाविक असल्याने तो परिसरात परिचित होता.त्याच्या अपघाती निधनाने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले.