शालेय रंगभूमीवरूनच भविष्यातील महान कलाकार घडतात.

शालेय रंगभूमीवरूनच भविष्यातील महान कलाकार घडतात.
कुकाणा प्रतिनिधी –
-जि.प.अहिल्यानगरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी – राहुल शेळके यांचे प्रतिपादन.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंब तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दिनांक 5 एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.बालपणापासूनच रंगमंचावरील वावर व सभाधीटपणा हाच विद्यार्थ्यांना महान रंगभूमी कलाकार होण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरतो.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ओळखल्या जातात.स्पर्धा परीक्षांची भीती कमी व्हावी व या परीक्षा बद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी मिशन आरंभ सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे व्यासपीठ जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी निर्माण करून दिल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितलं.गळनिंब शाळा चालू शैक्षणिक वर्षांमध्ये क्रीडा,बौद्धिक व सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रात आघाडीवर असून मुलांनी विविध स्तरावर व जिल्हा पातळीवर दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मी देखील या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान वाटतो.असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राहुल शेळके यांनी केले. याप्रसंगी लोकगीत,भारुड,पोवाडा,अभंग, लावणी,मराठी – हिंदी चित्रपट गीते तसेच ‘तिच्या जन्माची कहाणी’ ही बाल नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. पालकांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला व कार्यक्रमासाठी भरघोस बक्षिसे दिली.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके ,माजी पंचायत समिती सभापती अशोकराव शेळके ,अहिल्यानगर उत्तर जिल्हा शिवसेनाप्रमुख हरिभाऊ शेळके,अहिल्यानगर प्रहार संघटना कार्याध्यक्ष बाळासाहेब खर्जुले, मा.नायब तहसीलदार दादासाहेब शेळके,गावच्या सरपंच कुसुमताई खर्जुले,उपसरपंच विजुभाऊ घावटे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत शेळके व मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक भारत गवळी व अंबादास शेळके यांनी केले.कार्यक्रमासाठी अशोक मोरे, मोहिनीराज थोरात,भानुदास धाडगे,शरद खरात व दिपाली जाधव यांनी मुलांची तयारी करून घेतली.’तिच्या जन्माची कहाणी’ या जिल्हा पातळीवरील तृतीय क्रमांक प्राप्त नाटीकेची संहिता लेखन,संवाद व दिग्दर्शन शिक्षक अंबादास शेळके यांनी स्वतः केले.या कार्यक्रमात देणगी स्वरूपात पालकाकडून 66 हजार रुपये शाळेकरिता बक्षिसाच्या रूपामध्ये जमा झाले.जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक).भास्करराव पाटील यांच्या संकल्पनेतील मिशन आपुलकी अंतर्गत हा निधी शाळेला प्राप्त झाला.कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक,ग्रामस्थ,नेवासा तालुका व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक उपस्थित होते