नेवासा तालुका भकास करण्यात गडाख च कारणीभूत – भाऊसाहेब फुलारी.
तालुक्यात निधी उपलब्ध करण्यात लोकप्रतिनिधिला अपयश..
नेवासा तालुका भकास करण्यात गडाख च कारणीभूत – भाऊसाहेब फुलारी.
तालुक्यात निधी उपलब्ध करण्यात लोकप्रतिनिधिला अपयश..
नेवासा प्रतिनिधी -( महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा )
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात नेवासा तालुक्याला विकास निधी न मिळाल्याचा कांगावा आमदार गडाखानी प्रसार माध्यमातून तालुकाभर केला. नेवासा तालुक्याला जाणीवपूर्वक तसेच विरोधातील आमदार असल्याचे सांगत, विकास निधी न दिल्याचे सांगितले जात आहे,
परंतु नगर जिल्ह्यातील कर्जत -जामखेड पारनेर, श्रीरामपूर, कोपरगाव अशा अनेक मतदार संघात विरोधी आमदार असून देखील त्या विधानसभा सदस्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिळवला असून नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी तालुक्याचा निधी मागण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत गेले कीं पाकिस्तानच्या विधान सभेत गेले होते असा सवाल भाजपचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
पुढे फुलारी यांनी म्हटले आहे तालुक्याच्या विकासासाठी गडाख यांनी कुठलेही प्रयत्न केले नसून त्यांची कार्यप्रणालीच सपशेल अपयशी ठरली आहे, विकास निधीची मागणी केली असती तर मिळणाऱ्या कामांचे टेंडर आपल्या ठेकेदार कार्यकर्त्याला मिळतील कीं नाही या शंकने निधी साठीचा पाठपुरावाच केला नसल्याने विकास निधी मिळाला नाही यातून तालुका भकास करण्यास गडाखच कारणीभूत असल्याचा आरोप भाऊसाहेब फुलारी यांनी केला आहे.
त्याच बरोबर या अधिवेशनात श्री. संत ज्ञानेश्वर महाराज तीर्थ क्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास निधीची तरदूत केल्याची घोषणा विधानभावनात केली आहे. याचे ही श्रेय घेण्याची संधी गाडाखानी संस्थांनाच्या अध्यक्षाच्या मार्फत सोडली नाही, या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला विकास निधी मिळवण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ पासून वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असून, आमदार गाडाखानी मात्र याचे श्रेय लाटण्याचा मिश्किल प्रयत्न केला,
संस्थांनाच्या विकास निधीचे श्रेय संस्थांनाच्या अध्यक्षा मार्फत स्वतःची पाट थोपटून घेण्याचा प्रकार आहे.तसेच संस्थांनाला राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन वेळा बैठक घेतली मात्र त्या बैठकीस गडाख कधीच उपस्थित नव्हते बैठकीचे नियोजन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले होते, हा श्रेय लाटण्याचा
प्रकार म्हणजे उंदराला मांजरची साक्ष असाच प्रकार असल्याचे भाजपा चे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी पत्रकात म्हणले आहे, या सर्व प्रकारची गावोगावी खमंग चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.